आभाळ



हे भरून आलेलं आभाळ
काही केल्या रितं होत नाही..
पुन्हा पुन्हा बरसून सुद्धा,
समाधान त्याचं होत नाही,
एक पाऊल पुढे टाकून,
त्यालाही मोकळ्या आभाळात मिसळायचंय...
पण पूर्ण रितं झाल्याशिवाय,
त्याला पुढं जाता येत नाही...

कवयित्री: हर्षा पुष्कराज स्वामी

८ टिप्पण्या:

महेश सावंत म्हणाले...

छान लिहिली आहे

sanket म्हणाले...

छान कविता ! थोडक्यात उत्तम मांडलंय

Yogesh म्हणाले...

मस्त लिहली आहे.

Unique Poet ! म्हणाले...

छान....!

davbindu म्हणाले...

सुंदर झाली आहे कविता ... शोर्ट एन स्वीट ..पण मला वाटत हे तुम्हाला ढगाबद्दल बोलायचं आहे.

क्रांति म्हणाले...

सुंदर कविता.

विनायक पंडित म्हणाले...

मस्तच!

ulhasbhide म्हणाले...

पण पूर्ण रितं झाल्याशिवाय,
त्याला पुढं जाता येत नाही...

.... छान